अहिल्या नगर - बेकायदेशीर QR कोडने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला.QR कोड उपस्थिती नोंदवून गुमान काम करणाऱ्या शिक्षक नेत्यांना उपरती झाली आणि बहिष्कार सुरू झाला. दरम्यानच्या काळात जानेवारी २०२५ चा पगार झालेला असतानाही आपला कळप टिकवणे ,वाढवण्यासाठी QR कोडची भीती दाखवत "आम्ही समस्या सोडवू ' चा अयशस्वी प्रयोग झाला . त्यावेळी स्वतंत्र समता शिक्षक संघाने ' QR बेकायदेशीर असून जसा जानेवारीचा पगार झाला तसाच पुढील पगार होईल.शिक्षकांनी भीतीतून बाहेर यावे,असे आवाहन केले होते.काल पगार झाला आणि स्वतंत्र समता शिक्षक संघाची भूमिका योग्य ठरली असे स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते म्हटले आहे . प्रस्थापित शिक्षक संघटनांना QR कोडचे भांडवल करायचे असल्याने जो खटाटोप झाला ...त्यातून आपल्या माथी बायोमेट्रिक बसणार आहे ,ही बाब लक्षात घ्यावी.म्हणजे ... काढायला गेले कुसळ, माथी बसले मुसळ असेही ते म्हणाले.शिक्षक बांधवांनो जरा विचार करा...अवांतर कामे वाढली आहेत, माहिती मागण्याचा स्पीड कमी होत नाही ,प्रचंड दबावात काम सुरू आहे, याच आपल्या जिल्ह्यात शिक्षकांनी आत्महत्या केल्याच्या घटना असताना.....आपल्या कानी ' आम्ही समस्या सोडवतो ' ची हाकाटी येते आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना काही समस्या असल्यास त्यांनी संपर्क करून समस्या सांगाव्यात असेही आवाहन त्यांनी केले आहे.
अहिल्या नगर - बेकायदेशीर QR कोडने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला.QR कोड उपस्थिती नोंदवून गुमान काम करणाऱ्या शिक्षक नेत्यांना उपरती झाली आणि बहिष्कार सुरू झाला. दरम्यानच्या काळात जानेवारी २०२५ चा पगार झालेला असतानाही आपला कळप टिकवणे ,वाढवण्यासाठी QR कोडची भीती दाखवत "आम्ही समस्या सोडवू ' चा अयशस्वी प्रयोग झाला . त्यावेळी स्वतंत्र समता शिक्षक संघाने ' QR बेकायदेशीर असून जसा जानेवारीचा पगार झाला तसाच पुढील पगार होईल.शिक्षकांनी भीतीतून बाहेर यावे,असे आवाहन केले होते.काल पगार झाला आणि स्वतंत्र समता शिक्षक संघाची भूमिका योग्य ठरली असे स्वतंत्र समता शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते म्हटले आहे . प्रस्थापित शिक्षक संघटनांना QR कोडचे भांडवल करायचे असल्याने जो खटाटोप झाला ...त्यातून आपल्या माथी बायोमेट्रिक बसणार आहे ,ही बाब लक्षात घ्यावी.म्हणजे ... काढायला गेले कुसळ, माथी बसले मुसळ असेही ते म्हणाले.शिक्षक बांधवांनो जरा विचार करा...अवांतर कामे वाढली आहेत, माहिती मागण्याचा स्पीड कमी होत नाही ,प्रचंड दबावात काम सुरू आहे, याच आपल्या जिल्ह्यात शिक्षकांनी आत्महत्या केल्याच्या घटना असताना.....आपल्या कानी ' आम्ही समस्या सोडवतो ' ची हाकाटी येते आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना काही समस्या असल्यास त्यांनी संपर्क करून समस्या सांगाव्यात असेही आवाहन त्यांनी केले आहे.