गेल्या 22 वर्षापासून शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करत असलेले कर्मचारी अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देऊन देखील या कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवलेले. नाही किमान वेतन कायद्याप्रमाणे सुद्धा देखील त्यांना मानधन दिले जात नाही.सध्या त्यांना फक्त 2500 रुपये एवढेच मानधन दिले जाते. त्या बदल्यात भरमसाठ अशी कामे या कर्मचाऱ्यांचा करून घेतली जात आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की या कर्मचाऱ्यांना किमान दरमहा पंधरा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्रातील तमाम 3 लाख कर्मचाऱ्यांना आपण न्याय मिळवून यासाठी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांना सम्यक फौंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना शेवगाव यांच्या वतीने निवेदन आले. या प्रसंगी आमदार मोनिका राजळे यांनी या कर्मचार्यांच्या विविध समस्या समजून घेतल्या आणि ह्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविणार असल्याचे सांगितले.यावेळी शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष शिवकन्या गिरम तालुका सचिव सुनिता कणसे तालुका उपाध्यक्ष सिंधुताई भुसार ,संघटक आपशेते आदिसह अनेक पदाधिकारी व शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.
Wednesday, October 9, 2024

Home
Ahmednagar
news
शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार - आमदार मोनिका राजळे