ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ही योजना यशस्वी ठरली. या विजेत्यांना मोबाइल फोन, स्मार्ट वॉच आणि ५००० रुपयांहून अधिक किमतीची बक्षिसे प्रदान करण्यात आली. महावितरणने ग्राहकांना डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आणली होती. विजेते ठरवण्यासाठी पारदर्शक लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता.
ग्राहकांनी नियमित वीज देयक भरणा करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, तसेच महावितरणकडून देण्यात येणाऱ्या सौरऊर्जा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील
करण्यात आले.
याप्रसंगी कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.