आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752जी यांच्या कडुन सकारात्मक उत्तर नाही - उपोषण कर्ता शिवाजी पोपटराव कवडे यांचा सवाल - Shramik News

Breaking

Friday, January 3, 2025

आमरण उपोषणाचा दुसरा दिवस, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752जी यांच्या कडुन सकारात्मक उत्तर नाही - उपोषण कर्ता शिवाजी पोपटराव कवडे यांचा सवाल


 श्रमिक न्युज सौ सविता महेंद्र विधाते संपादिका दिनांक 4 जानेवारी 2025

कोपरगाव - कोपरगाव तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्ग चे काम चालू आहे 

त्यात रोड रुंदीकरण मध्ये अनेक शेतकरी यांच्या शेतातुन रोड रूंदीकरण चालू आहे सदर शेतकरी यांची शेतजमीन, एन ए प्लांट मधुन रुंदीकरण अधिग्रहित करण्यास सुरुवात केली आहे परंतु या शेतकरी यांना कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता विश्वासात न घेता व कोणताही शासकीय नियमानुसार मोबादला न देता राष्ट्रीय महामार्ग अभियंता संगमनेर विभाग याचा मनमानी कारभार राजकीय दहशतीखाली चालू आहे याला अपवाद कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असुन त्यांनी रोड रुंदीकरण मसुदा मध्ये शेतकरी व एन ए प्लांट धारक यांना विश्वास पुर्वक आधार न देता बेट नाका, पुणतांबा चौफुली कोकमठाण येथे डग्स बोगदा केल्याने अनेक दिवसांपासून या ठिकाणी अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे त्यात मोठा भिंतीचा बोगदा केल्याने चौफुली या ठिकाणी भविष्यात या अपघाताची जास्त शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग संगमनेर विभाग हे चक्क दुर्लक्ष करून वेळ काढु पणाने कामकाज करीत आहे इंजिनिअर आराखडा तयार करताना पहिले लोकप्रतिनिधी यांना दाखवला जातो त्याच्या सहीने व शेतकरी संमतीने मसुदा मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठवला जातो सदर पुणतांबा चौफुली येथे अपघाताचे प्रमाण वाढले असताना सुद्धा रोडच्या मधोमध बोगदा तयार करण्यात आला आहे सदर बोगद्याच्या दोन्ही बाजूला भिंत आहे बोगदा रुंदीकरण भिंत 100 फुट असुन यातुन जाणारी वहातुक हि दिसणार नाही विरुद्ध बाजुने जाणारी वहातुक यांचा मधोमध अपघात होईल हे आम्ही स्वतः उप विभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग संगमनेर यांच्या निदर्शनास आणून दिले आहे उपोषण स्थळी भेट देऊन समक्ष पण सांगीतले परंतु त्यांनी कळविले कि आमचे हात बांधलेले आहे लोकसेवक यांच्या संमतीने हा बोगदा मंजुर करण्यात आला आहे असे कळविले आहे परंतु या उडवा उडवीचे उत्तरास आम्ही उपोषण सोडणार नाही आम्ही ठाम आहे तुम्ही हा बोगदा पाडा सर्कल किंवा सावळविहीर प्रमाणे पिल्लर उड्डाणपूल रचना करावी म्हणजे अपघात रोखण्यासाठी मदत होईल चारही बाजूंनी येणारे जाणारे वहातुक सोईस्कर होईल यात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप असल्याने मनमानी कारभार सुरू आहे खरंतर राजकीय नेते यांनी तात्काळ लक्ष्य वेधून समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील असायला हवे आहे परंतु त्यांचे नेहमी दुर्लक्ष असुन वेठीस धरून आपलं राजकीय दहशत निर्माण करीत आहे समाजाला न्याय मिळवून दिला तर राजकीय नेते सुखी समाधानी जीवन जगु शकतात नाही तर परत फेड याच धर्तीवर असुन स्वच्छ प्रतीचं कर्म आवश्यक आहे परंतु चुकीचे काम करण्यात यशस्वी पणाच सोंग ढोंग करून कोपरगाव तालुक्यात वाळवंट करून दादागिरी करीत आहे 

 असे दिसून येते परंतु मुक्याला बुक्यांचा मार देण्यासाठी राजकीय नेते सदैव प्रयत्नशील आहे विकासासाठी शुन्य असल्याने समाजाला आमरण उपोषणाला बसावे लागत आहे त्यात हेच राजकीय नेते अपवाद आहे परंतु आम्ही समाजासाठी निस्वार्थी लढा देणार न्याय मिळवून देण्यासाठी जीवाचे बलीदान सुद्धा देऊ शकतो असा निर्वाळा आमरण उपोषण कर्ता शिवाजी कवडे यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिली आहे

Pages